शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

मराठा आरक्षण; वैधानिक बाबी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:43 IST

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी ...

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिलीे.यंदा उसाचे उत्पादन वाढले असून, पुढीलवर्षीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचा साखर उद्योगावर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. साखर निर्यातीला अनुदान मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांसाठीची साखर व उद्योगासाठीची साखर यांच्या दरात मोठी तफावत आहे. साखरेचे दर कमी झाले म्हणून बिस्किटांचे, मिठाईचे दर कमी झाल्याचे कधी ऐकीवात नाही. त्यामुळे साखरेचे दर घरगुती ग्राहकांसाठी वेगळे आणि उद्योगासाठी वेगळे ठेवण्याचे धोरण राबविण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ भेटणारसहकारमंत्री देशमुख म्हणाले की, देशात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन होत असते. त्यामुळे निर्यातीमधील तोटा भरून काढण्यासाठी फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच मोदी यांना भेटणार आहे.पोटनिवडणुकीबाबत चर्चा नाही!कडेगाव -पलूस मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने झालेल्या दु:खाचे सावट अद्याप कायम आहे.या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे; मात्र निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सुभाष देशमुख यांनी कडेगाव येथे सांगितले.