शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण; वैधानिक बाबी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:43 IST

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी ...

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिलीे.यंदा उसाचे उत्पादन वाढले असून, पुढीलवर्षीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचा साखर उद्योगावर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. साखर निर्यातीला अनुदान मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांसाठीची साखर व उद्योगासाठीची साखर यांच्या दरात मोठी तफावत आहे. साखरेचे दर कमी झाले म्हणून बिस्किटांचे, मिठाईचे दर कमी झाल्याचे कधी ऐकीवात नाही. त्यामुळे साखरेचे दर घरगुती ग्राहकांसाठी वेगळे आणि उद्योगासाठी वेगळे ठेवण्याचे धोरण राबविण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ भेटणारसहकारमंत्री देशमुख म्हणाले की, देशात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन होत असते. त्यामुळे निर्यातीमधील तोटा भरून काढण्यासाठी फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच मोदी यांना भेटणार आहे.पोटनिवडणुकीबाबत चर्चा नाही!कडेगाव -पलूस मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने झालेल्या दु:खाचे सावट अद्याप कायम आहे.या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे; मात्र निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सुभाष देशमुख यांनी कडेगाव येथे सांगितले.